रोज सकाळी पारीजात
फुलांनी सजवायचा माझं मन….
काटेरी पण मवाळ निवडूंग
घालायचा माझ्या भावनांना कुंपण….
दुडूदुडू धावणारे मऊमऊ पाय
रोज खेळायचे माझ्या अंगावर….
छोट्याशा चेंडूमागे पळणारे ते छोटे पाय
नेहमी तसेच राहिले असते तर…..
अनुभवताना स्वर्गिय सुगंध,
मी स्विकारली कोमेजली फुलं….
वाळलेल्या पानांना आणि तुटल्या पाकळ्यांना
माझं घर होतं नेहमीच खुलं….
एक दिवस हे सर्व संपलं,
आणि वाढ़लं फक्त निरूपयोगी गवत….
ओल्या आठवणींचीही आता
फक्त वाळलेलीच सोबत….
नितीन.


